© धनश्री दाबके
"बाबा, गल्लीत नको घेऊ हा गाडी. तिथे रस्त्याचे काम चाललंय तरीही सगळे पॅरेंट्स शाळेच्या गेटपर्यंत गाड्या आणतात आणि उगीचच गर्दी करतात.
परत जातांना ट्रॅफिकमधे अडकशील आणि हो उद्या दुपारच्या पॅरेंट्स मीटींगचे लक्षात आहे ना? आजच ऑफिसमध्ये तशी ॲरेंजमेंट करुन ठेव हा. विसरु नकोस प्लीज."
"हो, आहे ग लक्षात माझ्या. मी येणार आहेच पण उद्या तुझ्या दहावीसाठीच्या सब्जेक्ट सिलेक्शनची मीटींग आहे ना मग अपर्णाही असायला हवी तिथे. तिला आठवण केलीस का?"
"कमॉन बाबा. आई ?? आणि पॅरेंट्स मीटींगला?? तिला कुठे वेळ आहे ह्या सगळ्यासाठी ?? ती आणि तिचा रिसर्च एवढंच तर जग आहे तिचं.
"हो, आहे ग लक्षात माझ्या. मी येणार आहेच पण उद्या तुझ्या दहावीसाठीच्या सब्जेक्ट सिलेक्शनची मीटींग आहे ना मग अपर्णाही असायला हवी तिथे. तिला आठवण केलीस का?"
"कमॉन बाबा. आई ?? आणि पॅरेंट्स मीटींगला?? तिला कुठे वेळ आहे ह्या सगळ्यासाठी ?? ती आणि तिचा रिसर्च एवढंच तर जग आहे तिचं.
तसंही ती आली काय आणि न आली काय मला काहीच फरक पडत नाही. तेव्हा जाऊ दे."
"तनु, आईला असं नाही बोलू बेटा. ती किती बिझी असते माहितीये ना तुला?"
"बाबा मला ना कमाल वाटते तुझी. तू थकत कसा नाहीस रे? आईला तिच्या कामांतून फुरसत नाही आणि तुला मला समजावण्यातून.
"तनु, आईला असं नाही बोलू बेटा. ती किती बिझी असते माहितीये ना तुला?"
"बाबा मला ना कमाल वाटते तुझी. तू थकत कसा नाहीस रे? आईला तिच्या कामांतून फुरसत नाही आणि तुला मला समजावण्यातून.
Please dont try to convince me. आणि तसंही बाबा मला काही आईसारखी डॉक्टरेट घेऊन सायंटीस्ट वगैरे व्हायचे नाहीये.
मला माझ्या माणसांबरोबर वेळ घालवण्याची मुभा देणारं सर्वसामान्य लोकांसारखं साधंच आयुष्य जगायचंय. अगदी माझ्या वर्गातल्या त्या प्राचीची आई आहे ना, फक्त प्राचीला आणि घराला सांभाळणारी, तशी आई झाले तरी चालेल मला.
त्यामुळे माझे सब्जेक्ट्स ठरलेले आहेत जे तुला माहितच आहेत. So its not a big deal for us. तेव्हा प्लीज थांबव ही माझ्या आणि आईमधली मध्यस्थी आता." असं म्हणून तनवी गाडीतून उतरुन चालायलाही लागली.
तिला सोडून राजेशने ऑफिसकडे गाडी वळवली. पण त्याचे मन मात्र तनवीने वापरलेल्या मध्यस्थी ह्या शब्दाभोवती फिरत राहिले.
राजेश आईवडलांचा एकुलता एक लेक. पण त्याच्या दृष्टीने तो फक्त मम्माज बॉय होता. वडीलांना त्याच्या आयुष्यात असले तरी मनात मात्र अजिबात स्थान नव्हते.
राजेश आईवडलांचा एकुलता एक लेक. पण त्याच्या दृष्टीने तो फक्त मम्माज बॉय होता. वडीलांना त्याच्या आयुष्यात असले तरी मनात मात्र अजिबात स्थान नव्हते.
वडील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले. त्यात भावंडांत सगळ्यात मोठे. त्यामुळे मिळेल ते काम करत करत जसे जमेल तसे स्वतःचे आणि मग पाठच्या भावंडांचे आधी शिक्षण व मग नोकऱ्या, संसार हे सगळे सावरण्यातच गुंतलेले.
लहानपणापासून फक्त कष्ट आणि कष्ट करत आलेले. आईवडलांना जपणारे. त्यांच्यासह आपल्या सगळ्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावता उंचावता स्वतःचे जगणे विसरलेले.
त्यांना शाळेत शिक्षिका असलेली आणि त्यांच्या इतकीच सतत कष्ट उपसायला तयार असलेली बायको मिळाली जिने आपल्या नवऱ्याचे भावंडांवरचे प्रेम समजून घेऊन स्वतःच्या संसाराची आणि राजेशची पूर्ण जबाबदारी उचलली आणि निभावलीही.
एवढी समजूतदार आणि कर्तृत्ववान बायको मिळाल्याने वडलांनीही मग निश्चिंत मनाने राजेशला तिच्याकडे सोपवले आणि स्वतःला कामाला जुंपून घेतले. खूप पैसा आणि नाव कमावलं पण आपल्या मुलाच्या मनात काही ते आजतागायत शिरु शकले नाहीत.
राजेशसाठी वडील फक्त घरातले एक मेंबर आणि आई मात्र त्याची सब कुछ. त्याचा अभ्यास, खेळ, आवडीनिवडी, छंद, मित्र मैत्रीणींची गुपितं सगळं सगळं फक्त आईजवळ.
वडलांशी कधीच मोकळेपणाने काही बोलणे नाही आणि कसलेच बंध नाहीत. वडलांबद्दल त्याच्या मनात जी अढी लहानपणी बसली होती ती आज इतक्या वर्षांनंतरही तशीच होती.
आई त्याला खूप समजवायची. बाबा तुझ्यापासून मनाने लांब आहेत असं तुला जरी वाटत असलं तरीही तुला वाटतय ते खरं नाही. त्यांचाही तुझ्यावर माझ्याइतकाच जीव आहे. तेव्हा त्यांना थोडं समजून घे.
ती बाबांनाही सारखं सांगायची की आता तरी तुम्ही राजेशला वेळ द्या, त्याच्याशी मोकळेपणाने बोला. पण आईने दोघांना एकत्र आणायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांची मनं काही जुळली नाहीत ती नाहीतच.
शेवटी निराश होऊन आई म्हणायची की इतकी शिखरं सर केली मी आयुष्यात पण तुमच्यात मध्यस्थी करुन तुमचे नाते सावरायला मात्र काही मला जमले नाही.
घरात सगळं व्यवस्थित असलं तरी ही एक खंत आईच्या मनात कायम राहाणार ह्याची राजेशला खात्री होती. त्याच्या दृष्टीने त्यांच्या विस्कटलेल्या नात्यासाठी सर्वस्वी फक्त बाबा जबाबदार होते.
आज तनवी अगदी सहज म्हणाली असली तरी राजेश मात्र तिने उच्चारलेल्या मध्यस्थी ह्या शब्दाने अस्वस्थ झाला. जी व्यथा आईची आहे तीच आपल्याही वाट्याला येणार की काय ह्या विचाराने तो हादरला.
राजेश एका इंटरनॅशनल रिसर्च इंस्टीट्यूटमधे HR Director होता. इंस्टीट्यूटमधे येऊन कामाला लागला तरी त्याच्या मनात आज सारखी अपर्णा आणि तनवी मधली दरीच येत होती.
ह्या इन्स्टिट्यूटमध्ये बावीस वर्षांपूर्वी राजेश ज्युनियर ऑफिसर म्हणून लागला आणि इथेच त्याच्या आयुष्यात अपर्णा आली.
आज तनवी अगदी सहज म्हणाली असली तरी राजेश मात्र तिने उच्चारलेल्या मध्यस्थी ह्या शब्दाने अस्वस्थ झाला. जी व्यथा आईची आहे तीच आपल्याही वाट्याला येणार की काय ह्या विचाराने तो हादरला.
राजेश एका इंटरनॅशनल रिसर्च इंस्टीट्यूटमधे HR Director होता. इंस्टीट्यूटमधे येऊन कामाला लागला तरी त्याच्या मनात आज सारखी अपर्णा आणि तनवी मधली दरीच येत होती.
ह्या इन्स्टिट्यूटमध्ये बावीस वर्षांपूर्वी राजेश ज्युनियर ऑफिसर म्हणून लागला आणि इथेच त्याच्या आयुष्यात अपर्णा आली.
MSc Chemistry नंतर NET JRF एक्झॅम क्लीअर करुन अपर्णा तिच्या फेलोशिपच्या रिसर्चसाठी इंस्टिट्यूटमध्ये जॉईन झाली होती.
अतिशय कॉंफिडंट, हुशार आणि स्मार्ट असलेल्या अपर्णाच्या चेहऱ्यावर तिच्या असामान्य बुद्धीमत्तेची झळाळी होती.
खरंतर राजेशला ती पाहाता क्षणीच आवडली होती. आणि कामानिमित्त जस जशी त्यांची ओळख वाढत गेली तस तसा राजेश तिच्याकडे अजूनच खेचला गेला.
तिलाही राजेश आवडला आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
तिचा रिसर्चचा ध्यास आणि स्वतःला त्यात झोकून देण्याची प्रवृत्ती ह्या सगळ्याच्याच प्रेमात होता राजेश. पण अपर्णाला मात्र तिची हीच वृत्ती संसारात पडण्यापासून रोखत होती.
घर, संसार, मुलं, सासरची माणसं, सणवार म्हणजे एकंदरीतच लग्नासाठीच्या कमिटमेंट साठी आपण योग्य नाही असे तिचे मत होते जे काही अंशी खरेही होते.
पण तिच्या प्रेमात बुडालेल्या राजेशने तिला कुठल्याही अपेक्षांमधे न बांधता साथ देण्याचे वचन दिले व तिला तिच्या ध्यासासकट स्विकारले.
दोघं लग्न बंधनात अडकले.
दोघांमधल्या प्रेमाइतकेच दोघांचे करिअरही फुलत गेले.
दोघांमधल्या प्रेमाइतकेच दोघांचे करिअरही फुलत गेले.
फेलोशिप पूर्ण करुन डॉक्टरेट मिळवून अपर्णाने स्वतःचे रिसर्च युनिट चालू केले. ती पूर्णपणे तिच्या कामात बुडाली. तनवीच्या जन्मानंतरही राजेशच्या आणि सासूबाईंच्या भक्कम आधारामुळे अपर्णाने काम सुरुच ठेवले.
तिच्याही नकळत अपर्णा तनवीला राजेशवर सोपवून तिच्यापासून दूर होत गेली.
तिच्याही नकळत अपर्णा तनवीला राजेशवर सोपवून तिच्यापासून दूर होत गेली.
राजेशने कधीही तक्रारीचा सूर न आळवल्याने अपर्णा फक्त पुढे पुढे जात राहिली आणि इफेक्टिव्हली तनवीसाठी राजेश तिचा सर्वेसर्वा झाला.
आईला माझ्यासाठी वेळ नाही तर मलाही तिची गरज नाही ही भावना मनात रुजत गेली. आता आपली लेक मोठी झालीये आणि आईबद्दलची तिची ही अढी फार फार खोलवर गेलीये ह्याची आज राजेशला प्रकर्षाने जाणीव झाली.
बाबांसारखा बाबा न होता तनवीचा मित्र होण्याच्या नादात तिला तिच्या आईपासून दूर तर नेत नाही ना असा विचारही कधी मी केला नाही.
नकळत का होईना पण मी माझेच भाग्य माझ्या लेकीच्याही नशीबी लादले. आईने थकून जी सोडून दिली तीच मध्यस्थी आज परत माझ्यासमोर उभी आहे. फक्त आज मला त्याची दुसरी बाजू दिसते आणि कळतेही आहे .
मी जसा अपर्णाचा रिसर्चचा ध्यास जपत आलो तसाच आईने बाबांचा संघर्ष जाणून त्यांना आयुष्यभर साथ दिली. पण मला कधी ते समजलंच नाही.
नाण्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाऊन ती समजून घेण्यात माझे अर्धे आयुष्य खर्च झाले. स्वतः त्याच प्रकारच्या कात्रीत अडकल्यानंतरच मला आईबाबांच्या घालमेलीची धार समजली. पण नाही, मी तनवीच्या बाबतीत हे होऊ देणार नाही.
नाण्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाऊन ती समजून घेण्यात माझे अर्धे आयुष्य खर्च झाले. स्वतः त्याच प्रकारच्या कात्रीत अडकल्यानंतरच मला आईबाबांच्या घालमेलीची धार समजली. पण नाही, मी तनवीच्या बाबतीत हे होऊ देणार नाही.
अपर्णाचा रिसर्चचा ध्यास आणि मी तिला दिलेली साथ मला तनवीला उलगडून सांगितलीच पाहिजे.
अपर्णाचे कामात गढून जाणे आणि तुला पूर्णतः माझ्यावर सोपवणे हा तिचा निष्काळजीपणा किंवा तुझ्याबद्दलची अनास्था नसून तो तिचा तिच्या नवऱ्यावरचा गाढ विश्वास आहे. ही ह्या दरीची दुसरी बाजू मला तनवीला दाखवून द्यायलाच हवी.
अजून अनेक वर्षांनंतर स्वतः आई झाल्यावर तनवीला हे समजेलही कदाचित पण तेव्हा फार उशीर झालेला असेल.
ह्या सगळ्या विचारांत गढलेल्या राजेशने आधी चार दिवसांची सुट्टी ॲरेंज केली. घरी जाऊन सगळ्यात आधी तो तनवीशी बोलणार होता आणि उद्याची पॅरेंट्स मीटींग ॲटेंड करुन तो लगेच गावी निघणार होता.
ह्या सगळ्या विचारांत गढलेल्या राजेशने आधी चार दिवसांची सुट्टी ॲरेंज केली. घरी जाऊन सगळ्यात आधी तो तनवीशी बोलणार होता आणि उद्याची पॅरेंट्स मीटींग ॲटेंड करुन तो लगेच गावी निघणार होता.
आई आणि विशेषत: बाबांबरोबर वेळ घालवण्यासाठी.
हा ॲक्शन प्लॅन फायनल केल्यावरच राजेशच्या मनावरचे या मध्यस्थीचे ओझे उतरले आणि राजेश परत कामात गढून गेला.
हा ॲक्शन प्लॅन फायनल केल्यावरच राजेशच्या मनावरचे या मध्यस्थीचे ओझे उतरले आणि राजेश परत कामात गढून गेला.
क्रमश:
राजेशचा अॅक्शन प्लॅन यशस्वी होईल का? तो तनवीला समजावू शकेल का? तनवीच्या मनातली अपर्णा बद्दलची अढी कमी होईल का?
वाचा पुढील आणि शेवटच्या भागात.
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
छान तुमचे लिखाण वाचायला आवडेल 🙏
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद सर
हटवा👌👌 खूप छान
उत्तर द्याहटवाThank you so much mam !!
उत्तर द्याहटवा